जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
Balakot Air Strike News : पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर जोरदार हवाई हल्ला केला होता. मात्र या हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मारले गेले याबाबत सुरुवातीपासूनच वेगवेगळे आकडे समोर येत होत होते. ...
पुलवामा हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खानच्या मंत्र्याने दिलेल्या कबुलीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ...
Pakistan : पंतप्रधान इम्रान खान यांचे विश्वासू असलेले चौधरी यांनी असेंब्लीमध्ये जाहीर केले की, काश्मीरमधील पुलवामा येथे भारताच्या राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर आम्हीच हल्ला केला. भारताला घरात घुसून मारले, अशी वल्गनाही त्यांनी केली. पाक किती नापाक आहे ह ...
fawad choudhry : पाकिस्तानचे नेते फवाद चौधरी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर त्यांनी अनेकदा भारताविरोधात भाष्य केले आहे. ...