एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 22:15 IST2026-05-06T22:15:31+5:302026-05-06T22:15:46+5:30
या निवडणुकीत सेतुपती यांना ८३,३७५ मते, तर पेरियाकरुप्पन यांना ८३,३७४ मते मिळाली आहेत.

एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालांने संपूर्ण देशाला चकित केले आहे, मात्र यात सर्वाधिक चर्चा होतेय ती तिरुपत्तूर विधानसभा मतदारसंघाची. येथे अभिनेता विजयच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाचे उमेदवार सीनिवसा सेतुपती आर. यांनी चक्क 'एका' मताच्या फरकाने विजय मिळवत इतिहास रचला. त्यांनी डीएमकेचे दिग्गज नेते तथा माजी मंत्री के. आर. पेरियाकरुप्पन यांचा पराभव केला. या निवडणुकीत सेतुपती यांना ८३,३७५ मते, तर पेरियाकरुप्पन यांना ८३,३७४ मते मिळाली आहेत.
काय म्हणाले आनंद महिंद्रा ?
या एकामताने झालेल्या विजयाची चर्चा संपूर्ण देशभरात सुरू आहे. यातच प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही या विजयाची दखल घेतली आहे. यासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत ते म्हटले, "१६६००० पेक्षा जास्त मतदान झालेल्या मतदारसंघात केवळ एका मताने इतिहास बदलला, ही गोष्ट थक्क करणारी आहे. हे चित्र जगातील प्रत्येक शाळेत दाखवायला हवे. म्हणजे, भविष्यातील पिढ्यांना एका मताची ताकद समजेल." खरेतर, एका मताने मिळालेला हा विजय लोकशाहीतील प्रत्येक मताचे महत्त्व दर्शवणारा ठरला आहे.
The results of the recent state elections have been dramatic by any measure.
— anand mahindra (@anandmahindra) May 6, 2026
But for me, this image will remain the most unforgettable outcome of the elections.
More than 166,000 votes were cast between the two leading candidates in this constituency in Tamil Nadu.
And history… pic.twitter.com/85UtN3VkZC
विजय यांचा सत्तास्थापनेचा दावा -
या निवडणुकीत विजय यांच्या TVK पक्षाने १०८ जागांवर विजय मिळवला आहे. या यशानंतर विजय यांनी बुधवारी (६ मे २०२६) राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना भेटून अधिकृतपणे सरकार स्थापनेचा दावा केला. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे ज्येष्ठ नेते 'बुस्सी' आनंद, के. ए. सेंगोट्टैयन आणि आधव अर्जुन आदी उपस्थित होते. महत्वाचे म्हणजे, तामिळनाडून सत्ता स्थापनेसाठी ११८ जागांची आवश्यकता आहे. मात्र टीव्हीकेकडे केवळ १०८ जागाच आहेत.