भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 12:31 IST2026-05-06T12:31:13+5:302026-05-06T12:31:41+5:30
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून तिथे हिंसाचाराचा घटना सातत्याने समोर येत आहे.

भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून तिथे हिंसाचाराचा घटना सातत्याने समोर येत आहे. हिंसाचाराच्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४०० हून अधिक ठिकाणी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) कार्यालयांची तोडफोड करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, ४ मे पासून आतापर्यंत अनेक ठिकाणी निवडणुकीशी संबंधित हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या परिस्थितीनंतर राज्य सरकारने १० सदस्यीय 'फॅक्ट फाइंडिंग कमिटी'ची घोषणा केली आहे.
आसनसोलमधील गोधुली भागात टीएमसीच्या एका कार्यालयाची तोडफोड करण्यात आली, तर हावडा येथील दुमुरजाला येथील कार्यालयालाही टार्गेट करण्यात आलं. टॉलीगंज, कसबा, बारुईपूर, कमरहाटी, बारानगर, हावडा आणि बहरामपूर येथील टीएमसी कार्यालयांमध्ये तोडफोड झाल्याची माहिती आहे. बीरभूममध्ये, न्यू टाउनमध्ये आणि इतर दोन ठिकाणी कार्यकर्त्यांच्या हत्येच्या घटना समोर आल्या आहेत.
बंगाल में भारी हिंसा ! केंद्रीय सुरक्षा बल कहां चले गए? क्या भाजपाई गुंडों की सुरक्षा में लगी हैं सेंट्रल फोर्सेज..पूरे बंगाल से हिंसा की खबरें आ रही हैं। pic.twitter.com/Rx8Nne0ZOg
— Dr. Ashutosh Verma (Ashutoss) (@DrVermaAshutosh) May 5, 2026
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी कोलकाता येथील न्यू टाउन परिसरात विजय मिरवणुकीदरम्यान टीएमसी कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीत भाजपा कार्यकर्ते मधु मंडल यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे बीरभूमच्या नानूरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी टीएमसी कार्यकर्ता अबीर शेख यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा आरोप आहे.
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
पश्चिम बंगालमध्ये भाजपाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. राज्यात पहिल्यांदाच भाजपाचं सरकार स्थापन होणार आहे. ९ मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. भाजपाने प्रचंड बहुमत मिळवत २०७ जागांवर विजय नोंदवला आहे, तर टीएमसी केवळ ८० जागांवर आहे. ममता बॅनर्जी यांना स्वतःची जागाही वाचवता आली नाही. भवानीपूरमध्ये त्यांचा मोठा पराभव झाला असून सुवेंदु अधिकारी यांनी त्यांचा १५,११४ मतांनी पराभव केला आहे.
बंगाल में सिर्फ सत्ता बदली है राजनीतिक हिंसा का चरित्र नहीं बदला...
जनादेश नया है लेकिन मानसिकता वहीं पुरानी है जिसमें गुंडा एलिमेंट्स बहुत तेजी से झंडा बदलकर अपने धंधे में लग चुके हैं।
यहीं परिदृश्य लेफ्ट के समय था और जब TMC आई तो भी यहीं परिपाटी और बीजेपी की एंट्री के साथ यहीं pic.twitter.com/mCce8uoF5z— Politics (राजनीति) (@politicswith037) May 6, 2026