पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 07:41 IST2026-05-06T07:38:07+5:302026-05-06T07:41:09+5:30
Pakistan Navy Indian Crew Rescue:

पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
इस्लामाबाद: अरबी समुद्रात तांत्रिक बिघाडामुळे भरकटलेल्या एका भारतीय जहाजाला पाकिस्तान नौदलाने मदतीचा हात दिला आहे. 'एमव्ही गौतम' असे या जहाजाचे नाव असून, त्यावरील सहा भारतीय आणि एका इंडोनेशियन अशा एकूण ७ कर्मचाऱ्यांची मदत करण्यात आली आहे.
हे जहाज ओमानहून भारताकडे येत असताना अरबी समुद्रात त्यात 'गंभीर तांत्रिक बिघाड' झाला. यानंतर मुंबईतील 'मेरिटाइम रेस्क्यू को-ऑर्डिनेशन सेंटर'ने धोक्याचा इशारा जारी केला होता. या आवाहनाला प्रतिसाद देत पाकिस्तान मॅरिटाइम सिक्युरिटी एजन्सीच्या 'काश्मीर' या जहाजाने तातडीने बचाव मोहीम राबवली.
अन्न आणि वैद्यकीय मदत पुरवली
पाकिस्तान नौदलाने दिलेल्या निवेदनानुसार, त्यांच्या पथकाने जहाजावरील खलाशांना तातडीने अन्न, औषधे आणि इतर आवश्यक वस्तू पुरवल्या. तसेच, जहाजातील बिघाड दुरुस्त करण्यासाठी तांत्रिक मदतही दिली. "समुद्रातील मानवी जीव वाचवण्यासाठी आणि आपल्या सागरी जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, मग ती व्यक्ती कोणत्याही देशाची असो," असे पाकिस्तान नौदलाने म्हटले आहे.
Pakistan Navy rescued Indian ship. pic.twitter.com/GpIoH7OtTQ
— Big Brother (@ThatBigBrother) May 5, 2026
संघर्षाच्या वर्षपूर्तीनंतरचे दिलासादायक चित्र
विशेष म्हणजे, मे २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांच्या माध्यमातून चार दिवसांचा मर्यादित संघर्ष झाला होता. या घटनेला बरोबर एक वर्ष पूर्ण होत असतानाच, समुद्रात मात्र दोन्ही देशांच्या यंत्रणांमध्ये मानवतावादी दृष्टीकोनातून सहकार्य पाहायला मिळाले आहे.
Pakistan Navy continues to make us proud. Following a distress alert from Mumbai, PMSA Ship Kashmir swiftly rescued the stranded vessel MV Gautam in the Arabian Sea. Our forces provided immediate medical and technical aid to the Indian and Indonesian crew. Humanity first!… pic.twitter.com/uD8XOJkWRx
— Danish Nawaz (@DanishNawaz2773) May 5, 2026