देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राजीव रंजन उर्फ लालन सिंह म्हणाले, आमची निवडणूकपूर्व युती होती आणि आम्हाला पुढील 5 वर्षे सरकार चालवण्याची संधी मिळाली आहे. आम्ही तर यांच्या सोबतही होतो, तेथे गेल्यानंतर कळले की, हे लोक गिधाडासारखे चोची मारतात. त्यांचे वागणे आम्ही बघितले आणि नमस्कार ...
काँग्रेसने जागावाटपासाठी नेमलेल्या समितीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सात तर मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे तीन अशा दहा नेत्यांचा समावेश आहे. ...