राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Ajit Pawar Plane Crash Death: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला. हे वृत्त कळल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांना भावूक झाल्या. ...
Manoj Jarange Patil Reaction On Ajit Pawar Sad Demise: अजित पवार खूप मोठा सामाजिक, राजकीय आधार होते. काही केल्या ही बातमी पटत नाही. काय बोलावे कळतच नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात निधन झालं आहे. त्यांच्या अकाली एक्झिटमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनानंतर मराठी सेलिब्रिटी त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. ...
अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांची कार्यशैलीही पाहता, अनुभवता आली. त्यांच्या कामाचा झपाटा, निर्णय घेण्याची हातोटी, प्रत्येक विषयातला अभ्यास-माहिती, प्रशासनावरील पकड हे सगळं विलक्षण होतं ...