देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
- बाळकृष्ण परब - काँग्रेसच्या अनेक वर्षांच्या इतिहासामध्ये पक्षात अनेक वेळा फूट पडली आहे. मात्र थेट पक्षनेतृत्वाविरोधात आवाज उठवून पक्षात उघड दोन गट पडण्याचे प्रकार क्वचितच घडले आहेत. काँग्रेसमध्ये अशी मोठी फूट १९६७ ते १९७१ या काळात पडली होती. त्यावे ...
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायटल यांच्यातील मनभेद दूर झाले नसले तरी सध्यातरी या दोघांचीही गळाभेट घडवून आणण्याची तयारी पक्षश्रेष्ठींनी केली आहे. सचिन पायलट यांचे राजकीय नाराजी नाट्य जेवढे नाट्यमय होते तेवढ्याच नाट्यमयरीत्या काँग्रेसच् ...