देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण असणार, हे अद्याप गुलदस्त्यात असले, तरी एकूणच चित्र पाहता काँग्रेसची भिस्त बहुतांशी राष्ट्रवादीवरच अवलंबून असणार आहे. ...
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी नांदेड मतदारसंघात एकमेव अर्ज भरण्यात आला आहे. त्याचवेळी ५१ इच्छुकांनी ९३ अर्ज नेल्याची माहिती निवडणूक विभागातून देण्यात आली. ...
पत्रकार परिषदेत काँग्रेसचे कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख ट्रोजन डिमेलो यांनी पत्रकार परिषदेत न्यायालयात जाण्याबाबत कायदेशीर सल्ला आम्ही घेत आहोत, असे सांगितले. ...