देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राजस्थानमध्ये गेल्या वर्षी विधानसभा निवडणुका झाल्या. त्यावेळी एक नारा चांगलाच गाजला होता. 'मोदीजी से बैर नही, वसुंधरा की खैर नही' या नाऱ्यातून तत्कालीन मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याविषयीचा राग व्यक्त करण्यात येत होता. ...
उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात सलग पाचव्यांदा विजयी झालेले केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना यावेळीही बहुजन समाजाने मोठ्या प्रमाणात मते दिली हे स्पष्ट झाले आहे. ...