देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर जिल्ह्यातही महाविकास आघाडीच्या फार्मुल्यावर निवडणुका पार पडतील, अशी अपेक्षा होती. पण जिल्ह्यात महाविकास आघाडीचा प्रयोग काही जुळून आला नाही. ...
अमृता फडणवीस राजकारणात येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ठाकरे आडनावावरून टीका करणे हे वैफल्याचे लक्षण आहे. त्या सरकारच्या धोरणांवर खुशाल टीका करू शकतात, असंही चव्हाण म्हणाले. ...