देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
कुंडलवाडी नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या सुरेखा जिठ्ठावार काँग्रेसच्या मदतीने नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत. त्यांनी भाजपा उमेदवार रेहाना शेख यांचा १० विरूद्ध ६ मतांनी पराभव केला. ...
Rahul Gandhi Arrest News : राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. ...
Hathras Gangrape : काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी हाथरसला रवाना झाले आहेत. मात्र पोलिसांनी त्यांना अडवल्याची माहिती मिळत आहे. ...
Balrampur Horror : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपा आणि योगी सरकारवर निशाणा साधला आहे. "बेटी बचाओ नाही तर 'तथ्य लपवा, सत्ता वाचवा' हीच भाजपाची घोषणा" असं म्हणत राहुल यांनी हल्लाबोल केला आहे. ...
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे काही समाजकंटकांची शिकार झालेली मनीषा वालमिकी या तरुणीचा दहा दिवसानंतर दिल्लीमधील सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेविरोधात शहर युवक काँग्रेसकडून आ. विकास ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेशचे मुख् ...
या निर्णयानंतर काही लोकं मिठाई वाटून आनंद व्यक्त करत आहेत. एकमेकांचे अभिनंदन करत आहेत शुभेच्छा देत आहेत हे पाहून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर काही विशिष्ट लोकांनी अशाच प्रकारे आनंद व्यक्त करून पेढे वाटले होते याची आठवण येते असे दलवाई म ...