देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Kiren Rijiju: संसदेच्या आवारातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी एक व्हिडिओ जारी करत काँग्रेस खासदारांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ...
Congress MPs in Lok Sabha Speaker Chamber: काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात घुसून त्यांना शिव्या दिल्या आणि पंतप्रधान मोदींना धमकी दिली, असा आरोप भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याने केला आहे. ...
Nirmala Sitharaman And Rahul Gandhi : राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश 'विकला' आहे असा आरोप केला. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...
राज्याच्या कानाकोपऱ्यात झाडून साऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप, शिंदेसेना व दिवंगत अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस अशा महायुतीचा डंका वाजला ...
सेक्युलर फ्रंटमध्ये बिघाडी, कोणार्कने अपक्ष उमेदवाराला गटात घेतले आहे. त्यामुळे कोणार्कची संख्या ५ झाली आहे. सपाचे ६ नगरसेवकही कोणार्कच्या विलास पाटील यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. ...
लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार रणकंदण बघायला मिळाले. भारत- अमेरिका व्यापार कराराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते राहुल ... ...