देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
लोकसभेमध्ये अर्थसंकल्पावरील चर्चेत तालिका अध्यक्षांनी रोखल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेबाहेर बोलताना काही मुद्दे उपस्थित करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. ...
Congress News: महाराष्ट्र हे संपूर्ण देशात सर्वांत महाग वीज दर असलेले राज्य आहे, अनेक नवीन उद्योग राज्यात येण्यास तयार नाहीत, असा दावा केला गेला आहे. ...
Chandrapur : जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांत जनतेने काँग्रेसच्या पारड्यात कौल टाकला होता. त्याच विश्वासाची पुनरावृत्ती चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीतही झाली. ...
Rahul Gandhi News: लोकसभेमध्ये आज केंद्रीय अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घणाघाती भाषण करत केंद्र सरकारची चौफेर कोंडी केली. यावेळी राहुल गांधी यांनी जगभरात गाजत असलेल्या एपस्टा ...