देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी देवडिया काँग्रेस भवनात काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. माजी खा. विलास मुत्तेमवार आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी भाजपाचे पदाधिकारी रवी भैसारे, सुदर्शन सातपुते, कमलेश कोठावार, अरुण शेंडे, महेंद्र इंदूरकर, मंगेश उसरे आदी ...
तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत करा, या मागणीसाठी माजलगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलसमोर बुधवारी सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करण्यात आले. ...
हे सरकार आपले अपयश झाकण्यासाठी दुसऱ्याच्या डोक्यावर खापर फोडण्यात पटाईत आहे. राज्य दुष्काळाच्या खाईत असताना सरकार नावाची व्यवस्थाच कुठे दिसत नाही. दुर्दैवाने या सरकारला दुष्काळाची जाणीवच नसल्याने आम्ही ग्रामीण भागात वास्तव पाहणीसाठी फिरत असल्याचे विर ...
मध्य प्रदेश विधानसभेची निवडणुकीमध्ये बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून प्रत्येक मतदारसंघातील समीरकणांची आकडेमोड सुरू आहे. ...