देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
माजी आमदार सुभाष शिरोडकर यांच्याविरुद्धच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणात लोकायुक्त पी. के. मिश्रा यांच्यासमोर प्राथमिक चौकशीसाठी पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार आहे. ...
कर्नाटकातील काँग्रेस आमदार बी नारायण राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नामर्द असल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. सोमवारी कलबुर्गी येथील प्रचार सभेत मोदींवर टीका करत असताना काँग्रेस आमदाराची जीभ घसरली आहे. ...