देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मोफत आरोग्य सेवा देण्याचा निवडणूक वायदा करणारी मोदी सरकारची आयुष्यमान भारत योजना म्हणजे सर्वांत मोठी फसवणूक असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या योजनेची सत्यता लोकांसमोर आणण्यासाठी काँग्रेस मोहीम चालविणार आहे. ...
सतराव्या लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली, अधिसूचनाही निघू लागल्या; मात्र पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी असली तरी मिळालेल्या तीन जागा लढविण्यासही उमेदवार मिळेना झाले आहेत. ...
संघाचा आशीर्वाद असल्याशिवाय भाजपातील कोणालाही पंतप्रधान, मंत्री, राज्यपाल किंवा मुख्यमंत्री आदी महत्त्वाची पदे मिळत नाहीत, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी बुधवारी लगावला. ...
पटना साहिब जागेवर भाजपकडून केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांना मैदानात उतरविले जाण्याची शक्यता आहे. असं झाल्यास रविशंकर प्रसाद-शत्रुघ्न सिन्हा लढत पाहायला मिळणार आहे. ...