देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर आम्ही काँग्रेस पक्षातच आहोत. मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नाही, मात्र माझ्या जागेवर अचानक रात्रीतून दुसरा जिल्हाध्यक्ष नेमला. ...
काँग्रेस पक्षाच्या उत्तर पश्चिम मुंबई व उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील उमेदवारांचा तिढा अजून सुटलेला नाही. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या तिकीटांवरून निरुपम विरोधी गट आक्रमक झाले आहेत. ...
भारतीय जनता पार्टीत जाण्याची कोणतीही हालचाल सुरु नाही, वसंतदादा घराणे कधी काँग्रेस सोडणार नाही अशी ग्वाही काँग्रेसचे नेते प्रतिक पाटील यांनी दिली आहे ...
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगरच्या जागेचा निर्णय घेण्यास विलंब केल्यामुळे नगर सोबतच, अमरावती, रावेर, औरंगाबाद या जागांचे घोडे अडून बसले आहे. ...