देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
धानोरकर यांनी खासदारकी लढविण्यासाठी आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेला जय महाराष्ट्र केले होते. मात्र त्यांनाच काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली होती. ...
हिंगोली मतदार संघातून विद्यमान खासदार राजीव सातव यांचे तिकीट कापून २०१४ मधील शिवसेनेचे पराभूत उमेदवार सुभाष वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...