देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक सोमवारी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बोलावली असून जाहीरनामा तयार करणारी समिती निवडणूक जाहीरनाम्याला मान्यतेसाठी या बैठकीत सादर करू शकेल. ...
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे मतदारसंघात यंदाची स्थिती फारशी चांगली दिसत नाही. लोकसभेसह विधानसभा, तसेच महापालिका निवडणुकीत दारुण पराभवानंतर शहर काँग्रेसला पुन्हा उभारी घेता आलेली नाही ...