देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
देसाईगंज येथे युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांमार्फत केंद्र शासनाला निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, नोटबंदीमुळे कृषी, लघुउद्योग, मध्यम उद्योगाला फटका बसला. जीएसटीमुळे कुटीरोद्योग व अन्य उद्योगधंद्यांना फटका बसून बेरोजगारी वाढली. द ...
निफाड : देशात वाढलेल्या बेरोजगारीकडे लक्ष देऊन युवकांना तत्काळ रोजगार देण्याच्या मागणीचे निवेदन निफाड विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने निफाडच्या दहसीलदारांना देण्यात आले. नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांनी निवेदन स्वीकारले. ...
पेठ : कोरोना संसर्ग रोगामुळे गत सहा महिन्यापासून देशातील करोडो युवकांना रोजगाराला मुकावे लागले असून, आर्थिक संकटात सापडलेल्या युवकांना रोजगार मिळावा यासाठी पेठ तालुक्यात ‘रोजगार दो’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. तहसीलदार संदीप भोसले यांच्यामार्फत पेठ त ...