धक्कादायक... मुलीच्या वाढदिवशीच बापानं मुलाला ठार मारलं, पोलिसांना कारण सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 01:43 PM2020-05-30T13:43:40+5:302020-05-30T13:55:58+5:30

मध्य प्रदेशातील बालाघाट येथे शुक्रवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली.

बालाघाट येथे एका वडिलांनी आपल्या 8 वर्षाच्या निरागस मुलाला वैनगंगा नदीत बुडवून ठार मारले. मारेकरी वडील घटनेनंतर प्रथम त्याच्या घरी गेले. मुलाला नदीत बुडवल्याबद्दल सांगितले व नंतर कोतवाली येथे पोहचले आणि मुलाला ठार मारल्याची माहिती पोलिसांना दिली. (Photo Credit - Aaj Tak)

मुलाची हत्या करण्यापूर्वी वडील त्याला बाजारात घेऊन गेले. आरोपीच्या मोठ्या मुलीचा वाढदिवस होता. केक घेण्याच्या बहाण्याने वडिलांनी मुलाला आपल्यासोबत घेतले. मुलाचे दोन्ही हात बेल्टने बांधले आणि त्याला नदीत बुडवून ठार मारले. (Photo Credit - Aaj Tak)

कोतवाली टीआय विजय परस्ते यांनी सांगितले की, सुनील जयस्वाल नावाच्या व्यक्तीने त्याचा मुलगा प्रतीक याला नदीत फेकून ठार मारले. आरोपीने सांगितले की, आपल्याकडे कोणतेही काम नाही म्हणून त्याने आपला वंश संपविला.(Photo Credit - Aaj Tak)

हत्या केलेल्या वडिलांनी पोलिसांना आपल्या जबाबात सांगितले की, त्याला कोणतेही काम नव्हते. कुटुंबला पोसता येत नसल्याने त्याने आपल्या मुलाची हत्या केली. (Photo Credit - Aaj Tak)

मुलाची हत्या करुन आपला वंश संपवायचा होता असे तो म्हणाला. घरातील कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, काम नसल्यामुळे आरोपी अनेकदा तणावग्रस्त असायचा. त्यामुळे त्याने हे पाऊल उचलले.

कोतवाली टीआय विजय परस्ते यांच्या मते, आज आरोपी वडिलांच्या मोठ्या मुलीचा वाढदिवस होता. तो निशाच्या वाढदिवसाचा केक आणण्यासाठी आपल्या मुलासह बाजारात गेला, पण त्याने मुलाला मारले. आम्ही आरोपी वडिलांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.