राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
NCP Anniversary: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवारी शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोघांचेही मेळावे दणक्यात पार पडले. पुण्यातच वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या दोन्ही मेळाव्याचे आकर्षण मात्र दोन्ही गटांच्या मनोमिलनाच्या प्रश्नाभोवतीच ...
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शहरातील बहुसंख्य नगरसेवक अजित पवारांसोबत गेले होते. त्यानंतर वर्षभरातच या गटाला घरघर लागली. लोकसभा निवडणुकीनंतर या गटाला मोठे धक्के सोसावे लागले होते. ...