देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
1984च्या शीख दंगली प्रकरणात काँग्रेस नेता सज्जन कुमार याला दिल्ली उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर या निर्णयाचे भाजपा आणि अकाली दलाने स्वागत केले आहे. ...
'कर्म किसी का पीछा नहीं छोड़ता...' असे ट्विट करत शिवराज सिंह चौहान यांनी 1984 मध्ये उसळलेल्या शीख विरोधी दंगल प्रकरणी कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला. ...
जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने शहरात पाणीकपात करण्याचा आदेश दिल्यामुळे सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याच्या उद्देशाने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर पाणी भरण्याच्या रिकामी कळशी घेऊन आंदोलन केले. ...