देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
गोव्यात भाजपामध्ये पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून केले जात असलेले संघटनात्मक बदल पाहून या प्रदेशात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका येतील अशा प्रकारच्या चर्चेने वेग घेतला आहे. ...
एमआयएममध्ये अनेक वर्षांपासून शहराध्यक्षपद सांभाळणाऱ्या महंमद मुखीद यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला़ ...