देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
प्रयागराजमध्ये सध्या भक्तिमय वातावरणासहीत राजकारणाचेही जोरदार वारे वाहू लागले आहेत. कुंभ स्नानासाठी येण्यापूर्वीच येथे प्रियंका गांधींचे पोस्टर्स ठिकठिकाणी लावण्यात येत आहेत. ...
राहुल गांधींमध्ये पूर्वी दिसणारा अननुभवी राजकारणी जाऊन त्यांच्यात एक प्रभावी व गंभीर नेता असल्याचे साऱ्यांच्या लक्षात आले होते. तरीही प्रियंकांचे येणे महत्त्वाचे झाले त्याला कारण ती केवळ एक राजकीय शक्ती नसून एक प्रदीर्घ राजकीय परंपरा आहे. ...