देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
नुकत्याच आटोपलेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव केल्यानंतर आता आगामी लोकसभा निवडणुकीत या विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. ...
मतदान केंद्र दूर असल्याने त्यावेळी लोकांना सायकल,पायी किंवा बैलगाडीचा वापर करावा लागला होता. त्यावेळी मतदारांना स्वतंत्र बॅलेट पेपर बॉक्सची सुविधा देण्यात आली होती. बॅलेट पेपर बॉक्स बनवण्यासाठी अंदाजे ८ हजार २०० टन स्टीलचा वापर करण्यात आला होता. ...
आघाडीकडून राबविण्यात येणारी ही मोहिम केवळ सोशल मीडियावर नसून प्रत्यक्षात रस्त्यावर देखील सुरू करण्यात आली आहे. अनेक शहरात सर्व सामान्यांचे प्रश्न घेऊन 'लाज कशी वाटत नाही ? अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. ...
लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करणाऱ्या अनेक इच्छुकांचे ताबूत प्रत्यक्ष उमेदवारीनंतरही थंडावलेले नाहीत. त्यामुळे नाशिकमध्ये सध्या भाजपात असलेले माजी आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांनी बंडखोरीची तयारी केली आहे ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर वायनाडमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीत सहभागी असलेल्या केरळमधील एका स्थानिक पक्षाच्या झेंड्यामुळे काँग्रेसचे टेन्शन वाढले आहे. ...