श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
नीतीश कुमार हेच पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होतील, असे जेडीयूने स्पष्ट केले आहे. तर भाजपने मात्र थेट नाव घेतलेले नाही. यामुळे मुख्यमंत्रीपदासंदर्भात थोडा सस्पेंन्स निर्माण झाला आहे. ...
उत्तरेतील राज्यात भाजपची कामगिरी चांगली राहिली आहे. पण, खरं आव्हान पुढच्या वर्षी असणार आहे. भाजपचे दक्षिणेतील तीन राज्यात सत्ता मिळवण्याचं स्वप्न आहे. ...
नितीश यांच्या कॅबिनेटमधील २ मंत्र्यांचा पराभव झाला आहे. सहरसा जागेवर आलोक रंजन झा आणि चकाई येथून सुमित सिंह हे निवडणूक हारले आहेत. त्यामुळे हे दोघे कॅबिनेटमध्ये नसतील. ...
Bihar Assembly Election Result: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एकीकडे एनडीएने जोरदार मुसंडी मारली असली तरी काही मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरस दिसून आली. तसेच अगदी थोड्या फरकाने जय-पराजयाचा फैसला झाला. ...
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विरोधकांच्या प्रतिक्रिया केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत. अखिलेश यादव यांनीही आता सावध भूमिका घेतली आहे. ...