अकोला: आर्थिक वर्ष संपत आले असताना जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना पुरेसा निधी उपलब्ध झाला नसून, बळीराजा जलसंजीवनी योजनेचा निधीही कागदावरच असल्याने, यावर्षीही पूर्णा बॅरेजसह इतर प्रकल्पांच्या कामावर परिणाम होणार आहे. ...
जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून रबी हंगामासाठी जायकवाडी धरणातून गुरुवारी डाव्या कालव्यात १०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. या पाण्याचा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपयोग होणार असल्याने शेतक-यांनी समाधान व्यक्त केले. ...
लातूर जिल्ह्यातील डिसेंबरअखेर ११ हजार ८९३ शेतक-यांना कृषी विभागाच्या वतीने ३० कोटी रुपयांचे ठिबक सिंचन अनुदान देण्यात आले आहे. यातून जवळपास १५ हजार हेक्टरवरील क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. ...
तालुक्यातील व शेवगाव येथील महत्वाचा असलेल्या जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून उपकालवा करावा या प्रमुख मागणीसाठी पाणी फाऊंडेशनच्या वतीने १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता चकलांबा फाटा येथे एक तास रास्ता रोको करण्यात आला. ...
वाशिम: जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील गावळ (सं) लघु पाटबंधारे योजनेस एकूण अंदाजित खर्च २६ कोटी ९४ लक्ष १० हजार रुपये किंमतीस पाटबंधारे विभागाने बुधवारच्या निर्णयाद्वारे द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. ...
जलसंपदा विभाग आणि पुणे महानगरपालिकेच्या वादात पुणेकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे, याच्या निषेधार्थ गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सिंचन भवन येथे आंदोलन करण्यात आले. ...
शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मतदारसंघातील शंभर टक्के शेती सिंचनाखाली आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून मतदारसंघातील शेतक-यांना सिंचनाकडे घेऊन जाणार असल्याचे प्रतिपादन आ. प्रा. संगीता ठोंबरे यांनी केले. ...