भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
विधानसभा निवडणुकीच्या महत्वाच्या कामासाठी शेवगाव तहसील कार्यालयात २४ तास विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी दुर्लक्ष केल्याने येथील महावितरणचे अभियंता एस. एम.लोहारे यांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...
विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मुंबई येथील प्रिंटींग प्रेसमधून ११ हजार ६९५ शाईच्या बाटल्या जिल्ह्यासाठी पाठविल्या आहेत. मतदान केल्याची निशाणी म्हणून जिल्ह्यातील ३४ लाख ७३ हजार ७४३ मतदारांच्या बोटावर ही शाई लावण्यात येणार आहे. ...
निवडणूक यंत्रणेची जबाबदारी असलेल्या जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सध्या ईव्हीएम विषयीची विश्वासार्हता वाढविण्यासाठी जनजागृती मोहीम राबविली जात आहे. ...
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी ‘व्होटर स्लीप’चे वाटप १६ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करा, अशा सूचना भारत निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार यांनी शनिवारी दिले. ...
मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदानासाठी पेंच (रामटेक) परिक्षेत्रातील असलेल्या रिसॉर्ट व हॉटेलमध्ये राहण्यासोबतच भोजनामध्येसुद्धा १० ते २५ टक्के सवलत देण्यात येत असल्याची माहिती रामटेकचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी शुक्रवारी दिली. ...