देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
जिथे मर्यादित स्थान आहे तिथे मत विभाजनाचे काम काँग्रेसने करू नये, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी छोट्या पक्षांना जागा वाटपात महत्त्वाचे स्थान द्या, असे सुचविले आहे. ...
पाचपैकी तीन राज्यांतील निवडणुकांत काँग्रेसने मिळविलेल्या यशानंतर सांगली जिल्'ातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते चार्ज झाले असले तरी, सोबतीला गटबाजीही तितक्याच उत्साहाने रिचार्ज होताना दिसत आहे. ...