देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल : मध्य प्रदेशात तब्बल 15 वर्षांनंतर भाजपानं राज्य गमावलं आहे. अटीतटीच्या सामन्यात भाजपाला 109 तर काँग्रेसला 114 जागांवर विजय मिळाला. 15 वर्षांनंतर भाजपाला जनतेनं नाकारलं, असा दावा काँग्रेसचे नेतेमंडळी करत आहेत. पण क ...
संपूर्ण भाजपा ज्यांना पप्पू म्हणून संबोधतो त्या राहुल गांधी यांच्या कठोर मेहनतीमुळे काँग्रेसने हिंदी भाषक राज्यांत ‘अजेय’चा दावा करणाऱ्या भाजपाचे सिंहासन हलवून सोडले. ...
राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांचे निकाल भाजपाला निराश करणारे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्साहावर आणि लक्ष्यावर काही परिणाम होताना दिसत नाही. ...
आता ९0 सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसला तब्बल ६८ जागा मिळाल्या आहेत. भाजपाचा तर दारूण पराभव (केवळ १५ जागा) झाला. बसपा व अजित जोगी यांच्या आघाडीला ७ जागा मिळाल्या. त्यामुळे पुढील पाच वर्षे तरी काँग्रेसला राज्यात धोका नाही. ...
राजस्थानात काँग्रेसला सहजासहजी बहुमत मिळेल, असे अंदाज सर्वच सर्वेक्षणांनी वर्तवले होते. मात्र, निकाल लागू लागल्यानंतर बहुमताच्या आकडा गाठेपर्यंत काँग्रेसची दमछाक झाली. ...