देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
विशेष मुलाखत - काँग्रेस पक्ष एकाच कुटुंबासाठी आणि कुटुंबाकडून चालविला जाणारा पक्ष आहे. घराणेशाहीवर चालणाऱ्या पक्षांचे अस्तित्व एका कुटुंबासाठी असते. खासगी कंपनीच्या अविर्भावात ते पक्ष चालवत असतात ...
घराणेशाहीच्या राजकारणाचाही जनतेला वीट आला आहे. त्यामुळे गेल्या वेळेपेक्षा अधिक बहुमताने पुन्हा भाजप आणि मित्रपक्षांचेच सरकार सत्तेवर येईल, असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला. ...
उत्तर प्रदेशातील ग्राउंड रिपोर्ट पाहिल्यास, समाजवादी पक्ष आणि बसपाने भाजपसमोर खडतर आव्हान उभे केले आहे. अनेक जागांवर दोन्ही पक्ष भाजपपेक्षा मजबूत आहेत. सपा, बसपाच्या जातीच्या समीकरणांना शह देण्यासाठी भाजपने लोकसभा निवडणूक मोदीविरुद्ध इतर अशी केली आहे ...