देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
दिल्लीतील हिंसाचारावरून होत असलेल्या गोंधळात पीठासीन अधिकारी मीनाक्षी लेखी आणि सरकार यांच्यातील हातमिळवणीतून काँग्रेसचे सात खासदार अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या राहिलेल्या कालावधीसाठी गुरुवारी निलंबित केले गेले. ...
काँग्रेसच्या आठ आमदारांना भाजपाच्या काही नेत्यांनी जबरदस्तीने हरियाणातील एका हॉटेलमध्ये ठेवल्याचा आरोप काँग्रेसचे मंत्री जीतू पटवारी यांनी केला होता. ...
या आंदोलनावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. गॅसची एक मोठी प्रतिमा तयार करून त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावण्यात आले होते. दुस-या बाजुस कॉंग्रेसच्या नेत्यांसह गॅसदरवाढीचा निषेध करणारा फलक लावण्यात आला होता. ...
मध्य प्रदेशातून राज्यसभेवर तीन सदस्य निवडण्यात येणार आहे. यापैकी दोन जागांवर काँग्रेसचा विजय निश्चित आहे. दोनपैकी एका जागेवर दिग्विजय सिंह यांना राज्यसभेवर जायचं आहे. ...