देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
भाजपच्या नेत्यांनी केवळ सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला नसून राज्याच्या विकासावर आक्रमण केले आहे. शेतकरी आणि युवकांच्या उज्ज्वल भवितव्यावर भाजपने वार केल्याचे कमलनाथ म्हणाले. ...
केंद्रातील भाजप सरकारकडून राज्यघटनेने मिळालेले ‘एससी,’ ‘एसटी’ व ‘ओबीसी’ आरक्षण रद्द करण्याचा घाट घातला जात आहे. हे चुकीचे असून, कॉँग्रेस या विरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशारा जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला. ...
काँग्रेसच्या एका आमदाराने विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपविला आहे. मात्र, आपल्याकडे कोणाचाही राजीनामा आलेला नाही, असे विधानसभा अध्यक्षांचे म्हणणे आहे. ...
या व्यतिरिक्त बहुजन समाज पक्षाच्या आमदारासह अपक्ष आमदारांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात येण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश सरकारमध्ये अजुनही पाच मंत्रीपद रिक्त आहेत. त्यामुळे नाराज नेत्यांची या मंत्रीपदांवर वर्णी लागू शकते. ...