देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राजद आणि काँग्रेसची सरकारे असताना बिहारमध्ये गुन्हेगारी वाढली. त्यांच्यामुळे बिहार साक्षरतेच्या बाबतीत मागे ढकलले गेले, अशी टीका मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. ...
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची वाढती जवळीक पाहता महापालिका निवडणुकीत मनसे-उद्धवसेनेची युती होईल अशी चर्चा सुरू आहे. मात्र त्याबाबत कुठलीही औपचारिक घोषणा झाली नाही. ...
Congress Vijay Wadettiwar News: प्रताप सरनाईक यांच्या संस्थेला शाळेसाठी आरक्षण बदलून जागा देण्यात आली, मंत्र्यांच्या संस्थेला जमीन देता येते का? असा सवाल करण्यात आला आहे. ...
"राजदच्या १५ वर्षांच्या राजवटीत ६० हून अधि नरसंहार, ३० हजारहून अधिक अपहरणाच्या घटना घडल्या आहेत. बिहारमध्ये काँग्रेस आणि राजद जोडी जंगलराज घेऊन आली होती." ...