देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
MGNREGA Bachao Sangram Yatra: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याच्या (मनरेगा) जागी नवीन कायदा आणण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध काँग्रेसने शुक्रवारी निषेध मोर्चा काढला. केंद्र सरकारला महात्मा गांधी यांच्या नावाशी संबंधित कोणताही काय ...
Shashi Tharoor News: काही मुद्द्यांवरील माझी भूमिका भाजपचे समर्थन करणारी नव्हे तर सरकारचे, देशाचे समर्थन करणारी आहे, असे काँग्रेसचे नेते व लोकसभा खासदार शशी थरूर यांनी सांगितले. ते म्हणाले की, काही आंतरराष्ट्रीय विषयांवर मी नेहमीच राजकारणापेक्षा देश ...
अन्सारी यांनी आपल्या मुलाखतीत अफगाणिस्तानपर्यंतचा प्रदेश त्या काळी भारताचाच भाग असल्याचे सांगत, असा तर्क मांडला की, जर तो भाग भारताचा होता, तर तिथून आलेले लोकही भारतीयच होते. ...
Shashi Tharoor News: काँग्रेसमधील काही मुद्द्यांविषयी आपल्याला असलेल्या आक्षेपांबद्दल त्या पक्षाचे खासदार शशी थरूर यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची गुरुवारी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. ...