देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, "जे पुस्तकच प्रकाशितच झालेले नाही, त्याचा संदर्भ विरोधीपक्ष नेते सभागृहात देऊ शकत नाहीत." मात्र, यानंतरही राहुल गांधी वारंवार जनरल नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख करतच होते. दरम्यान गदारोळ एवढा वाढला की... ...
Chandrapur : काँग्रेसच्या २७ नगरसेवकांपैकी तब्बल १८ नगरसेवक आपल्या सोबत असल्याचा दावा वडेट्टीवार गटाकडून करण्यात येत असून, या संख्येत आणखी वाढ होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. ...
गोवा मागील १४ वर्षात विकासाच्या नावाने १४० वर्ष मागे गेला आहे. कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे, असा आरोप गोवा महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसांनी केला. ...