तालुक्यात ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर फळबागा आहेत. दुष्काळामुळे त्या अंतिम घटका मोजत आहेत. कारण पाणी विकत घेऊन शेतकरी फळबागा जगवित आहेत तर शासनाने हेक्टरी १८ हजार रु पये अनुदान मंजूर केले असून ते पण ९ हजाराप्रमाणे दोन टप्प्यात दिले जाणार आहे. ...
माजलगाव धरण आणि दरवर्षी चार ते पाच मृत्यू अशी प्रथाच मागील चार ते पाच वर्षांपासून पडली आहे. धरणाच्या भिंतीवर पोलीस सुरक्षा ठेवली असून, प्रतिबंधित क्षेत्र असतानाही कसलीच सुरक्षा नसल्यामुळे हे क्षेत्र मृत्यूचा सापळा ठरत आहे. ...
आष्टी तालुक्यात प्रशासनाकडून १४४ शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी यातील काही टँकर आर्थिक हितासाठी चोरून पाण्याची विक्र ी शेततलाव किंवा फळबाग धारकांना करताना दिसून आले. ...
जनावरांना पिण्यासाठी पाणी शेंदताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने विवाहितेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील कोद्री येथे मंगळवारी दुपारी घडली. ...
जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५० टक्के पाऊस झाल्यामुळे दिवसेंदिवस पाणी पातळी कमालीची खालावत असून मागील पाच वर्षांच्या तुलनेत पाणी पातळी सरासरी ७ मीटरपर्यंत घटली आहे. ...