Next

त्यांच्या चितांची अग्नी आजही डोळ्यासमोर | Maratha Reservation Cancel | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 05:06 PM2021-05-05T17:06:19+5:302021-05-05T17:06:36+5:30

आरक्षणासाठी लढणाऱ्या मराठा समाजाच्या पदरी अपयश आलंय. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द ठरवला आहे. त्यामुळे मराठा समाजासाठी आजचा दिवस हा दुर्दैवी असल्याच्या प्रतिक्रीया देण्यात येतायत. या निकालाचा परिणाम राज्यातील करोडो मराठा समाजातील तरुणावर होणार आहे. नोकरीमध्ये आणि शिक्षणात आऱक्षणासाठी मराठा समाज आग्रही होता. आता आरक्षणचा निर्णयच रद्द झाल्याचे अनेक युवकांचे नुकसान होणार आहे. शैक्षणिक प्रवेश आणि नोकर भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या मराठा तरुणांवर यांचा थेट परिणाम होणार आहे. मराठा आरक्षणा अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांच्या नोकर्‍यांवरही टांगती तलवार असल्याचं बोललं जातंय. सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेअधीन राहून अनेक नियुक्त्या करण्यात आल्या होत्या.