चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. Read More
रोहित शर्माच्या दुखापतीमुळे शिखर धवनला १८ सदस्यांच्या संघात स्थान मिळाले आहे. पण अंतिम ११मध्ये त्याला संधी मिळेल का, याबद्दल निवड समिती प्रमुख चेतन शर्मांनी विधान केलं आहे. ...
भारताचा एक संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत असताना दुसऱ्या संघाचे कर्णधारपद शिखर धवनला देण्यात आले होते. पण श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेनंतर धवनला संघात स्थानच मिळत नव्हते. ...
Maharashtra Captain Ruturaj Gaikwad ऋतुराज गायकवाडनं यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक ६०३ धावांचा पराक्रम केला आहे. त्यानं केवळ पाच सामन्यांत चार शतकांसह ही आघाडी घेतली आहे. ...
India Tour to South Africa : भारतीय संघ १६ डिसेंबरला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली बारतीय संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ...