रत्नागिरीतील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सच्या सदस्यांनी जीवाचे रान केले आणि राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण येथील सवतकडा धबधब्यामध्ये अडकलेल्या १३ पर्यटकांना जीवदान दिले. दोन वाजता सुरू झालेली ही मोहीम तब्बल तीन तासांनी फत्ते झाली. ...
गुहागर तालुक्यातील रानवी गावातील रमेश बारगोडे यांच्या घरातील पडवी बिबट्या बसलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. हा बिबट्या काल (सोमवारी) रात्री शिरल्याचा अंदाज असून, तो जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. ...
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात केमोथेरपी केंद्र सुरू करण्याच्या भाजपचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या निर्णयामुळे सिंधुदुर्गातील रुग्णांबरोबरच नातेवाईकांची फरफट टळण्यास मदत होणार आहे. ...
पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले याबद्दल पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांच्या हस्ते रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांचा सत्कार करण्यात आला. ...
हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राजापूरच्या गंगामाईचे रविवारी पहाटे पुन्हा आगमन झाले आहे. अवघ्या चार महिन्यांतच गंगामाई पुन्हा अवतरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीसमोर सादर करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या विकासकामांचे आराखडे १८ जुलैपर्यंत तयार करुन ते पूर्ण करावेत, अशी सूचना झालेल्या जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत देण्यात आल्याची माहिती प्रभारी अध्यक्ष संतोष थेराडे यांनी दिली. ...
रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता कशी साध्य करता येईल, यासाठी सर्व संबंधीत घटकांमध्ये समन्वय निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. ...