देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मुल्लानी यांनी यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ऑनलाईन तक्रार केली आहे. आपल्या तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की, मागील दोन दिवस सोशल मीडियावर 'मैं भी चौकीदार हूं' हे गाणे भाजपकडून प्रसारित केले जात आहे. ...
मराठा मोर्चांच्या वेळी हर्षवर्धन जाधव यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली होती. त्यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलण्यास आपल्यावर शिवसेना नेत्यांकडून प्रतिबंध लावल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ते राज्य पातळीवर चर्चेत आले होते. ...
काही महिन्यांपूर्वी मुली पळविण्याच्या वक्तव्यावरुन चर्चेत असणारे भाजपचे आमदार राम कदम यांनीही ट्विटरवर चौकीदार राम कदम असं नाव ठेवलं. मात्र याचाच आधार घेत काँग्रेसने मोदी कॅम्पेनवर टीका केली आहे. ...
प्रियंका गांधी देशाच्या दुसऱ्या इंदिरा गांधी आहेत असं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून नेहमी सांगण्यात येतं. आज त्याचा प्रत्यय म्हणून उत्तर प्रदेश काँग्रेसने 40 वर्षांपूर्वीचा एक फोटो शेअर केला आहे. ...