देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
अमेठीत प्रचारासाठी काही वेगळ करण्याची आवश्यकता नाही. अमेठी आणि रायबरेली मतदार संघ शेजारीच आहेत. हे दोन्ही मतदार संघ काँग्रेसचे पारंपरिक मतदार संघ आहेत. येथे विजय निश्चित असून किती मताधिक्य मिळणार हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार असल्याचे सातव म्हणाले. ...
ज्या मसूद अजहरवर मोदी बोलत आहेत, त्याला काँग्रेसच्या काळात पकडण्यात आले होते. मात्र भाजपने त्याला कंधारपर्यंत नेऊन सोडले. यावर पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे अशी मागणी राहुल यांनी केली. ...
आमच्यासाठी काँग्रेस-आपची युती झाली की नाही, हे महत्त्वाचे नाही. वैयक्तील मला असं वाटत की, काँग्रेस-आपची युती झाली असती आणि आम्ही त्यांचा पराभव केला असता तर भाजपला त्याचा अधिक लाभ झाला असता, असं हर्षवर्धन यांनी नमूद केले. ...