देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
नागपूर लोकसभा मतदार संघातील मतमोजणी गुरुवारी कळमना मार्केट परिसरात होत आहे. मतमोजणी प्रक्रि येसाठी शहर काँग्रेसने प्रतिनिधींची नियुक्ती केली आहे. मतमोजणी करण्यापूर्वी सर्वबाजूंनी ईव्हीएम तपासण्याची दक्षता घ्या, अधिकाऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास न ठेव ...
गेल्या दिड वर्षापासून काँग्रेस नेतृत्वाची धूरा राहुल गांधी यांच्या हातात आहे. मागील 5 राज्यातील निवडणुकांनतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसला मिळालेलं यश वाखणण्याजोगे होते. ...
लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे साऱ्यांचेच लक्ष लागले असताना, मध्ये प्रदेशमधील कॉंग्रेसचे आमदार फोडण्याचा भाजप कडून हालचाली सुरु असल्याच्या आरोपामुळे राजकीय वातावरण तापले असल्याचे पहायला मिळत आहे. ...
बिहारमध्ये भाजप, जदयू आणि लोजपा यांची युती मजबूत स्थितीत आहे. तर राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस-रालोसपा-हम-आरएलएसपी आणि व्हीआयपी यांची महाआघाडी पूर्णपणे अपयशी ठरण्याची शक्यता आहे. ...