देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Delhi Assembly Election 2020 Results Updates: मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल पाहता आपने जोरदार मुसंडी मारत तब्बल 53 जागांवर आघाडी घेतली आहे. ...
राजधानी दिल्लीत काँग्रेसची पुन्हा एकदा पिछेहाट झाले आहे. अनेक राज्यांत सत्तेत असलेल्या काँग्रेसला दिल्लीत खातंही उघडता आले नाही. आपमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या अलका लांबा विजयी होतील, अशी शक्यता होती. मात्र त्या देखील पिछाडीवर असल्याचे समजते. ...