देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मध्य प्रदेशातून राज्यसभेच्या तीन जागा रिक्त झाल्या आहेत. भाजपच्या कोट्यातून प्रभात झा आणि सत्यनारायण जाटिया तर काँग्रेसच्या कोट्यातील दिग्विजय सिंह यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. ...
Jyotiraditya Scindia : माझ्यासाठी आजचा दिवस काहीसा भावनिक दिवस आहे. जी संघटना आणि ज्या कुटुंबात मी माझी वीस वर्षे घालवती, माझी मेहनत, संकल्प ज्यांच्यासाठी खर्च केले. त्या सर्वांना सोडून मी आज तुमच्या हवाली होत आहे. ...
वरिष्ठ काँग्रेसनेते डी.के. शिवकुमार यांना कर्नाटकच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करून काँग्रेसने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शिवकुमार यांचे पक्षात वजन असून त्यांना पक्षसंघटन वाढविण्यासाठी त्याचा लाभ होणार आहे. ...