देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायटल यांच्यातील मनभेद दूर झाले नसले तरी सध्यातरी या दोघांचीही गळाभेट घडवून आणण्याची तयारी पक्षश्रेष्ठींनी केली आहे. सचिन पायलट यांचे राजकीय नाराजी नाट्य जेवढे नाट्यमय होते तेवढ्याच नाट्यमयरीत्या काँग्रेसच् ...
नाशिक : आदिवासी दिनानिमित्त शहर परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ठिकठिकाणी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच विविध ठिकाणी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ...
सर्व मिळून सशक्त समाजाची उभारणी करूया! सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा.’ परंतु, काही लोक वातावरण कलुषित करतात व त्याचे परिणाम देशाला निष्कारण भोगावे लागतात. झुंडशाहीने होणाऱ्या हत्या, अफवा पसरविणे व लोकांना चिथावणे बंद व्हायला हवे ...
भाजपचे लोक देशातील लोकशाही कमजोर करीत आहेत. देशातील जनता हे सहन करणार नाही, अशा शब्दांत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी रविवारी भाजपवर हल्लाबोल केला. ...