देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
घोडेबाजारात बोली लागते. किंमत ठरते. ती कधी रोकड्यात असते, तर कधी पुढच्या पदांचं गाजर दाखवलं जातं. एकदा ठरलं की, नाराजांना आणि आपल्या सोबत येणाऱ्यांना उचललं जातं. ...
भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते गोमांस निर्यात करताना पकडले गेले तर काही कार्यकर्ते हे पाकिस्तानी आयएसआयचे एजंट म्हणून काम करताना पकडले गेले आहेत. ...
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आमदार सुनील दत्ती यांच्या घरी लग्नाचा कार्यक्रम (Wedding Ceremony) होता. यावेळी कुण्या तरी संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने हे सर्व जण संक्रमित झाले आहेत. ...
अभिनेता अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यावरील भाष्यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले, "मी अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या विरोधात नाही, तर त्यांच्या कामाच्या विरोधात बोललो आहे." (Nana Patole) ...
देशातील सर्वांत जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला आर्थिक चणचण भासत असल्याची माहिती मिळाली आहे. काँग्रेसला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून, यासाठी एक बैठक घेण्यात आली. काँग्रेसची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असून, या बैठकीत निधी उभारण्यावर चर्चा करण्यात ...
काँग्रेस सरकार असताना पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यावर ट्विट करणारे अभिनेते अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांचे चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. तसेच चित्रपटांचे शूटिंगही बंद पाडू, असा इशारा नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला होता. यावरून आरोप ...