९ आॅगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या राज्यव्यापी बंददरम्यान वाळूज एमआयडीसीमधील जवळपास ६० कंपन्यांत तोडफोड, वाहने जाळणारे ते समाजकंटक मराठा क्रांती मोर्चाचे नाहीत. पोलिसांनी त्यांना अटक करावी, या घटनेचा तपास सीआयडीमार्फत करावा, अशी मागणी क ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (दि.९) पुकारलेल्या बंददरम्यान आंदोलकांनी कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केलेल्या तोडफोडीमुळे वाळूज औद्योगिकनगरी चांगलीच हादरली आहे. या घटनेमुळे भविष्यातील नवीन गुंतवणुकीला ब्रेक लागणार असल्याची चिंता उद्योजकांनी ...
मुस्लीम समाजाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पाच टक्के आरक्षण द्या या मागणीकरिता जमियते उलमाए हिंदतर्फे तहसील कार्यालयासमोर तीन तास धरणे आंदोलन करण्यात आले. ...
अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने खरीपाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत. या मागणीसाठी आडस येथील शिवाजी महाराज चौकात रास्तारोको केले. ...
रिसोड:तालुक्यातील लिंगा कोतवाल फाटयावर शुक्रवार १० आॅगस्ट रोजी सकाळी नऊ ते साडेबारा वाजताच्या दरम्यान सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साडेतीन तास रास्ता रोको करण्यात आला. ...
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी भुसावळ परिसरात आयोजीत करण्यात आलेल्या बंदमुळे जनजीवन प्रभावीत झाले होते. आंदोलनादरम्यान ठिकठिकाणी मोर्चे, ठिय्या आंदोलन करून कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने ९ आॅगस्ट रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा ऐतिहासिक अनुभव शहरवासीयांनी घेतला. बस जाळण्याची किरकोळ घटना वगळता संपूर्ण शहरावासीयांनी शांततेत अभूतपूर्व बंद पाळला. शहर प्रथमच १० तास कडकडीत बंद होते. ...
जालना शहरासह तालुक्यात सकल मराठा सामाजाच्या वतीने आयोजित चक्का जाम आंदोलन गुरूवारी शांततेत पार पडले. शहरातील हॉटेल अंबर, एमआयडीसी येथे आंदोलन करणारे आणि पोलीस आमने-सामने आले होते. दोन्ही ठिकाणी सौम्य लाठीमार केल्यावर वातावरण शांत झाले. ...