नवव्या पतीनं केली हत्या, अनैतिक संबंधांतून गळ्यावरून फिरवला सुरा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 08:42 PM2020-08-01T20:42:10+5:302020-08-01T20:56:15+5:30

नऊ लग्न करणाऱ्या  ३० वर्षीय महिलेची तिच्या नवव्या पतीने हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन पतीने पत्नीला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. 

हैद्राबादमधील पहाडी शरीफ या भागात धक्कादायक घटना घडली. नवव्या पतीने ३० वर्षीय पत्नीची हत्या केली आहे

आरोपी पती नागार्जुन हा कुरनूर जिल्हयातील श्रीराम कॉलनीत राहतो. तो व्यवसायाने टॅक्सी ड्रायव्हर आहे. वरालक्ष्मी हिच्यासोबत नागार्जुनचे संबंध वाढले होते.

वरालक्ष्मी काटेदार इंडस्ट्रीयल भागात काम करत होती. कालांतरने त्या दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. त्यासाठी दोन वर्षांपूर्वी वरालक्ष्मीने आपला पती व मुलाल सोडलं व नागार्जुनशी लग्न देखील केलं.

लग्नाच्या काही महिन्यांनंतर त्या दोघांमध्ये खटके उडू लागले. आपल्या पत्नीची दुसऱ्या पुरुषांसोबत होत असलेली जवळीक नागार्जुनला आवडत नव्हती. त्यातून तिची हत्या नागार्जुनने केली.

नागार्जुनने वारंवार तिला याबाबत सांजवत होता. मात्र, तिचे दुसऱ्या पुरुषांसोबतचे वागणे बदलत नव्हते. मंगळवारी पुन्हा याच गोष्टीवरुन दोघांमध्ये वादंग निर्माण झाला. त्यावेळी नागार्जुनने रागाच्या भरात तिच्या गळ्यावरुन सुरा फिरवला.

या घटनेनंतर नागार्जुनने स्वत:च पोलीस स्टेशनला जाऊन आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये नागार्जुन हा महिलेचा नववा पती असल्याचे उघडकीस आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला पुरुषांशी जवळीक साधत कालांतराने त्यांच्याशी लग्न करत होती.